अबनपल्ली गावाचे पुनर्वसन करा : जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार

537

-तहसीलदार यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
अहेरी, २ सप्टेंबर : तालुक्यातील ग्रा.प.व्येँकटरावपेठा अंतर्गत येणाऱ्या अबनपल्ली गाव नदी काठावर वसलेले असून दर वर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे गावातील प्रत्येक घरा मध्ये पाणी शिरते त्यामुळे नागरिकांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते तसेच पूर आल्याने गावकऱ्यांना गाव सोडुन पूर ओसरत पर्यंत मुला बाळांना व पाळीव प्राण्यांना घेऊन बाहेर गावी जावून राहावे लागले. त्यामुळे अबनपल्ली गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.
गावकऱ्यांनी आपल्या गावातील समस्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडे घेऊन गेले असते आपण शासनाकडे अबनपल्ली या गावाला पुनर्वसनासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे माजी जि.प.अध्यक्षांनी आश्वासन दिले व लगेच निवेदन तयार करून आलेल्या गावकऱ्यांना सोबत पकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळेस माजी जि. प.सदस्य अजय नैताम, नरेंद्र गर्गम , प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी व संपूर्ण अबनपल्ली गावातील नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here