– १३ ऑक्टोबरला मतदान
The गडविश्व
मुंबई, ७ सप्टेंबर : राज्यातील १८ जिल्ह्यांमधील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान पार पडणार आहे तर मतमोजणी १४ ऑक्टोबर रोजी पार पडणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
संबंधित तालुक्यातील तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान दाखल करता येतील. मात्र, २४ आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी शनिवार-रविवारची सुट्टी असल्याने या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. दाखल झालेल्या अर्जांची छाननी २८ सप्टेंबर २०२२ रोजी पार पडणार आहे. तर, ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजतपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. ग्रामपंचायती निवडणुकीचे मतदान १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पार पडणार आहे. मतमोजणी दुसऱ्याच दिवशी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे.

कोणत्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतीच्या निवडणूका ?
गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 आणि गडचिरोली- 1.
चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 आणि ब्रह्मपुरी- 1.
भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 आणि साकोली- 1.
वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7.
नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 आणि कुही- 8.
गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 आणि अर्जुनी मोर- 2.
ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, आणि शहापूर- 79.
पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 आणि वाडा- 70.
रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 आणि श्रीवर्धन- 1.
रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 आणि राजापूर- 10.
सिंधुदुर्ग: दोडामार्ग- 2 आणि देवडगड- 2.
नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 आणि पेठ- 71.
नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 आणि नवापूर- 81.
पुणे: मुळशी- 1 आणि मावळ- 1.
सातारा: जावळी- 5, पाटण- 5 आणि महाबळेश्वर- 6.
कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 आणि चंदगड- 1.
अमरावती: चिखलदरा- 1.
वाशीम: वाशीम- 1.