– खेडेगांव येथील आविका शासकीय धान खरेदी केंद्राचे उदघाटन
The गडविश्व
ता. प्र /कुरखेडा, ०३ : मागील काही वर्षांत बि – बियाने, रासायनिक खते, औषधी तसेच मजुरीचे दर वाढल्याने धानाचा उत्पादन खर्च वाढलेला आहे मात्र त्या तुलनेत धानाची भाववाढ झालेली नाही त्यामुळे धान शेती परवडत नाही व शेतकऱ्यांना शासकीय मदतीवर अवलंबून राहावे लागते. धानाला उत्पादन खर्चाचा अनुरूप योग्य भाव मिळाल्यास शेतकरी स्वतः सक्षम बनत परावलंबी राहणार नाही असे प्रतिपादन आमदार रामदास मसराम यांनी केले.
खेडेगांव येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचा शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्राचे उदघाटन आमदार मसराम यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज माजी पं. स. सभापती परसराम टिकले, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे, तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट, माजी जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी, आविका संस्थेचे सभापती राजीराम पुराम, उपसभापति देविदास बंसोड, संचालक लोकचंद दरवडे, शंकर पाटनकर, शिवचरण मडावी, नामदेव दर्रो, टून्नू दर्रो, केवळराम जमदाळ, अंताराम कूमोटी, शशीकला जमदाळ, तूळजाबाई गोटा, संस्थेचे व्यवस्थापक देवराव खंडारकर, तुकाराम डोंगरवार, विश्वनाथ मेश्राम, मधूकर डोगंरवार, उपसरपंच भूमेश्वर सोनवाने, पोलीस पाटील परसराम नाट, टेमनशहा सयाम, दिलीप दर्रो, नरेश मडावी, होमराज कवडो तसेच मोठ्या संख्येत शेतकरी बांधव हजर होते.
यावेळी पुढे मार्गदर्शन करताना आमदार मसराम यांनी सांगीतले कि शासकीय धान खरेदी केंद्र सूरू होण्यास दरवर्षी विलंब होत असल्याने गरजू शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना धान विकतो, येथे हमीभावापेक्षा दर कमी राहत असल्याने त्यांचे नूकसान होते त्यामूळे यापूढे वेळेवर शासकीय धान खरेदी केंद्र सुरु व्हावे म्हणून शासनाकडे योग्य तो पाठपूरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्यानचंद सहारे यांनी मानले.